तंबाखू मुक्त शाळा अभियानात उरण तालुक्यातून पहिली तंबाखू मुक्त शाळा म्हणुन रा.जि. प.प्राथ.शाळा मोठीजुई शाळेला मिळाला बहुमान...
22 जानेवारी /अशोक म्हात्रे
तंबाखू मुक्त शाळा अभियान अंतर्गत पंचायत समिती उरण शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाऊंडेशन व आसान सेवाभावी सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यशाळेत महाराष्ट्र शासनाच्या 10 फेब्रुवारी 2021 च्या निर्णयानुसार तंबाखूमुक्त शाळेसाठी नवीन निकष सांगण्यात आले होते. ते निकष कसे अपलोड करावेत, कोण कोणते उपक्रम राबवावेत यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले होते. त्यानुसार उरण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री अंजने साहेब,सर्व अधिकारी वर्ग, सलाम मुंबई जिल्हा समन्वयक श्री संदेश देवरूखकर सर, प्रकल्प समन्वयक श्री.आदेश नांदवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा मोठीजुई या शाळेने विविध उपक्रम राबवून तसेच तंबाखू मुक्त शाळा, परिसर, गाव व घर कसे करता येईल तंबाखूचे दुष्परिणाम, याबाबतचे मार्गदर्शन, तंबाखू मुक्तीची शपथ, १०० यार्ड परिसरातील सर्व दुकानदारांना तंबाखूजन्य पदार्थ न विकण्याचे निवेदन देऊन शासनाचे नऊ निकष पूर्ण करून उरण तालुक्यातून *तंबाखूमुक्त शाळा* म्हणून पहिला येण्याचा बहुमान मिळविला आहे त्यामुळे विविध स्तरातून शाळेचेअभिनंदन होत आहे. या मोहिमेसाठी सहकार्य करणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत मोठीजुईच्या विद्यमान सरपंच सौ ललिताताई पाटील व सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम भोईर, उपाध्यक्षा सौ. तृप्ती ताई बंडा व सर्व सदस्य, शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री. संजय होळकर सर, सौ रंजना म्हात्रे मॅडम, श्री दर्शन पाटील सर, श्री संदीप गावंड सर, शर्मिला पाटील मॅडम, श्री यतीन म्हात्रे सर, श्रीमती ज्योती बामणकर मॅडम, सर्व विद्यार्थी वर्ग, पालक यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुभाष म्हात्रे सर यांनी आभार व्यक्त केले.
हनुमान - शेवा कोळीवाड्यातील मच्छिमारांचे समुद्रमार्गे चॅनेल बंद आंदोलन पुनर्वसनाच्या बनावट दस्तावेज तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा जेएनपीटीकडून शासनाने जमीन घेऊन शेतकऱ्यांना परत करावी.मा. लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचे आदेश सन १९८२ ते १९८७ चे शासनाच्या मापदंडाचे मंजूर असलेले पुनर्वसन न करता विस्थापितांना गेली ४० वर्षे संक्रमण शिबिरात ठेवून अधिकाऱ्यांनी पुनर्वसनाच्या बनावट दस्तावेज तयार करून शेवा ( हनुमान ) कोळीवाडा गावातील विस्थापितांच्या मानवी जीविताचा छळ चालविलेला असल्याने अधिकाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने फौजदारी गुन्हे दाखल करत नसल्याच्या निषेधार्थ बुधवार दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजी हक्काच्या मासेमारी परिसरात शेवा ( हनुमान ) कोळीवाड्यातील मच्छिमार ग्रामस्थ आपल्या कुटुंबासह " चॅनेल बंद आंदोलन " करणार आहेत. या आंदोलनाला समस्त आगरी, कोळी, मच्छिमार बांधवांनी आपल्या बोटी घेऊन सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे. समाजातील खासदार श्री. संजयभाऊ पाटील, खासदार श्री. सुरेशदादा ( बाळ्यामामा ) म्हात्रे, आगरी सेना प्रमुख श्री. राजाराम साळवी, आगरी समाज ने...
Comments
Post a Comment