आवाज कोकणचा / नवी मुंबई

प्रतिनिधि

मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या प्रदूषणामुळे  स्थानिक आक्रमक गावदेवी सामाजिक संस्था आंदोलनाच्या पावित्र्यात.....,





नवी मुंबई शहर वसवण्यासाठी 1970 ला महाराष्ट्र शासनाने रायगड, ठाणे जिल्ह्यातील हजारो एकर जमिनी संपादित केल्या व त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकल्प आणले .



 तळोजा एमआयडीसी विभागात  मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड, कैराव केमोफॉर्ब, वेदांत डायस्टफ यासारख्या अनेक कारखाने व वेगवेगळे प्रकल्प उभे राहिले आहेत . 


या कारखान्यामधून निघणारा विषारी धूर, केमिकल युक्त सांडपाणी , कंपन्यातून निघणारे दुर्गंधीयुक्त वास यामुळे घोट कॅम्प घोट कोयना वेळे, सिद्धी करवले, तळोजे मजकूर, भोईर वाडा, गोंधळी वाडा, नागझरी चाळ, तोंडरे , सिडको फेज 1 व 2 , पेंधर या लगतच्या गावातील पारंपारिक पाणीसाठा तसेच बाजूने वाहणाऱ्या नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे. 



 या सगळ्याचा परिणाम येथील मानवी जीवन , पशुपक्षी , निसर्ग यांच्यावर झालेला आहे . यामुळे नदीपात्रात पारंपारिक होत असलेली मासेमारी व शेती ही संपुष्टात आली असून स्थानिक बेरोजगार होत आहेत. 



प्रदूषण पसरवणाऱ्या कारखान्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळांने ताबडतोब कारवाई करून येथील मानवी जीवन व निसर्ग यांचे रक्षण करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी गावदेवी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हरिचंद्र कोळी , खजिनदार रुपेश प्रधान , रमेश पाटील  यांनी शासनाकडे केली आहे.

वेळीच प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर कारवाई केली नाही तर गावदेवी सामाजिक संस्था व परिसरातील सर्व जनता एकत्र येऊन मोठे आंदोलन उभारण्याची तसेच आवश्यकता वाटल्यास आमरण उपोषण करण्याची माहिती अध्यक्ष हरिश्चंद्र कोळी यांनी दिली आहे. 








Comments

Popular posts from this blog