आवाज कोकणचा / मुंबई

जयराज कोळी ( बातमीदार )

मा. मुख्यमंत्री व अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्री यांना माहिती अधिकार महासंघातर्फे डाबर च्यवन प्राश भेट देऊन अनोखे राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा...



अन्न व औषध प्रशासनाचा भोंगळ कारभार चोराला चौकीदार केला ... सुभाष बसवेकर


महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन खात्यात चाललय तरी काय ?



आज बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी मराठी पत्रकार भवन मुंबई येथे माहिती अधिकार महासंघाचे संस्थापक तथा अध्यक्ष मा.सुभाष बसवेकर यांच्या अध्यक्षतेखाली व कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.जयराज कोळी याच्या प्रमुख उपस्थितीत अन्न व औषध प्रशासनाचा भोंगळ कारभार याविषयी पत्रकार परिषद पार पडली.

     गेल्या काही महिन्यांपासुन राज्याच्या अन्न व औषध प्रशासन खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला दिसुन येत आहे.मागील दिड वर्षामध्ये तीन मंत्री पाहिलेल्या या विभागामध्ये काही महिन्यांपासुन भ्रष्टाचारी अधिका-यांच्या विभागातील महत्वाच्या पदांवर बिनबोभाट नियमबाह्य नियुक्त्या दिल्या जात  आहेत. त्यापैकी काही निवडक कर्तबगार अधिकाऱ्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन कारवाई झालेल्या भ्रष्ट अधिकऱ्याना निलंबन कारवाई नंतर पुन्हा सेवेत घेताना त्यांच्यावर कारवाई झालेल्या महसुल विभागाऐवजी दुसऱ्या विभागामध्ये नियुक्ती देणे अप कारक असताना अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये मागील वर्षामध्ये पुणे विभागामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन कारवाई झालेल्या श्री.साहेबराव देसाई या अधिकाऱ्याला केवळ सात ते आठ महिन्यामध्ये त्याच्यावरील चौकशी चालू असताना देखील पुन्हा पुणे विभागामधेच सोलापुर जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आलेली आहे. तसेच त्या अधिकाऱ्याला विभागाच्या पुणे विभागाच्या भरारी पथकाचा प्रमुख म्हणुन नेमण्यात आलेले आहे. त्यानंतर अन्न व औषध विभागानेच लावलेल्या गुटखाबंधी मध्ये विभागाचाच एक अधिकारी श्री. कुचेकर याचे नाव गुटखा तस्करीमध्ये पोलिसानी दाखल केलेल्या एफ.आय.आर.मध्ये आलेले असताना, विभागानेच त्या अधिकाऱ्याची विभागिय चौकशी  सुरु करुन त्याला निलंबित केले, त्यानंतर काही महिन्यातच त्या अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले आणि त्या अधिकाऱ्याला औरंगाबाद विभागामध्ये नियुक्ती देण्यात आलेली आहे, ही बाब म्हणजे चोरालाच चौकिदार बनविण्याची आहे.

त्याचबरोबर ठाणे कार्यालयातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन कारवाई झालेल्या श्री.अरविंद कांडेलकर या अधिकाऱ्याला देखील राज्याच्या भरारी पथकाचा प्रमुख म्हणुन नियुक्त करण्यात आलेले आहे, तसेच हा अधिकारी वर्ग २ पदावर असताना देखील त्याच्याकडे वर्ग १ पदाचा कार्यभार  सोपविण्यात आलेला आहे.

हे कमी म्हणून की काय, विभागातील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या बहुतांश अधिका-यांवरील कारवायांच्या धारीका मंत्रालयीन स्तरावरच बंद  करण्यात आलेल्या आहेत.

अशाच पद्धतीने  बदल्या झाल्यानंतरही बहुतांश अधिका-यांना मागील दाराने पुन्हा त्यांच्या पसंतीनुसार त्याच जिल्ह्यामध्ये प्रतिनियुक्ती देण्यात आलेली आहे.

त्याचबरोबर अधिकारी व कर्मचारी यांची पदोन्नती नंतर एका जिल्ह्यातुन दुसऱ्या जिल्ह्यात नियुक्ती देणे बंधनकारक असताना देखील काही विशेष अधिकारी व कर्मचारी यांना मंत्री महोदयांच्या आदेशांवरुन पुन्हा त्याच जिल्ह्यात  पदोन्नती नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत.

 सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त निवृत्त होऊन जवळपास 60 दिवसाचा कालावधी उलटला तरी पद रिक्तच आहे. तसेच ८ विभागिय सह आयुक्तांपैकी ५ पदे देखील रिक्त आहेत यामुळे अधिकाऱ्यांवर कोणाचाच अंकुश राहिलेला नाही सगळा सावळा गोंधळ सुरू आहे. 



 सध्याचे या खात्याचे मंत्री यांनी खात्याचा पदभार स्वीकारल्यापासून ऐतिहासिक नोंद केली आहे ती म्हणजे लाच लुचपत विभागाकडून मागील काहीच महिन्यात जवळपास ६-७ अधिकारी लाचलुचपत विभागाकडून ट्रॅप झालेले आहेत. विभागातील अधिकाऱ्यांच्या वरती अवैध कामाचा व चंदा गोळा करण्याचा दबाव आणला जातो अशी दबक्या आवाजात  चर्चा आहे.

आपल्या देशातील मुंबई हे महत्वाचं तसेच मनुष्य संख्येने व आर्थिक दृष्ट्या मोठे शहर असुन यात अन्न सुरक्षा अधिकारि ४८ पदे असून देखील सध्या आश्चर्यकारक म्हणजे तेथे फक्त ४-५ अन्न सुरक्षा अधिकारी  इतक्या मोठ्या शहराचा कार्यभार पाहत आहेत त्यामुळें नागरिक कोणत्या प्रकारचे अन्न व औषध सेवन करत आहेत याचा काही ताळमेळ लागत नाही. 

महाराष्ट्रातील सर्व जील्हात अन्न व औषध प्रशासनाचा कार्यालय चालू असून यामध्ये अन्नसुरक्षा अधिकारी वेगवेगळ्या अन्नाचे नमुने घेतात ते तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवले जातात या प्रयोगशाळेचा अहवाल येण्यासाठी कमीत कमी 90 दिवसाचा कालावधी तरी निश्चितच लागतो कारण 36 जिल्ह्याचा कार्यभार फक्त चारच प्रयोगशाळा वरती चालु असून हे सरकारला निदर्शनास येत नाही का ?  यामुळे घेतलेले अन्न नमुने तात्काळ तपासून न झाल्यामुळे अनेक प्रश्नांना व अडचणीला सामोरे जावे लागते यातून नागरिकांच्या जीवितस धोका निश्चितच निर्माण झालेला आहे ते कोणत्यातरी मोठया दुर्घटनेनंतरच जीवित हानी झाल्यावरच जागे होणार का ?

महाराष्ट्रात सध्या चार प्रयोगशाळा कार्यरत असून त्यांनादेखील सरकारकडून अपुरी यंत्रसामग्री,साहित्य पुरवठा तेही वेळेत भेटत नसल्यामुळे अन्न व औषध नमुनांचे परीक्षण वेळेत होतच नाही.

या आणि अशा बऱ्याच बाबी उघड उघड बेधडक होत असुन त्यामाध्यमातुन काही भ्रष्ट अधिका-यांना खास मंत्री महोदयांच्या वसुली करताच नेमलेले आहे. तसेच या भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी याना विशेष टार्गेट देण्यात आले असल्याचे देखील विभागातील सुत्रांकडुन समजते.

यामुळे राज्याच्या अन्न व औषध प्रशासनातील या उघडपणे सुरु असलेल्या भोंगळ कारभारावर राज्यातील विरोधी पक्ष आवाज उठवितात की नाही आणि मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब अथवा उप-उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार साहेब हे कसे नियंत्रण मिळवतात हेच पहावे लागेल. याविषयी तात्काळ  पावले उचलली नाही तर मा.मुख्यमंत्री व अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री यांना महासंघातर्फे डाबर च्यवन प्राश भेट देऊन अनोखे राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे.

   या पत्रकार परिषदेमध्ये दयानंद वाल्मीक,देविदास जाधव, रूपाली जाधव,समाधान मस्के,दीपक पाटील ऍड.स्वाती पाटील, स्नेहा रवंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog