Posts

Showing posts from September, 2022

सुरज यादव यांनी लंपी रोगाबाबत मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

Image
दिनांक ३० सप्टेंबर २२ --------------------------------------- सुरज यादव यांनी लंपी रोगाबाबत मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन --------------------------------------- सध्या लंपी या रोगाने जनावरांना बाधित करण्याचा धुमाकूळ घातला असून परराज्यांसह महाराष्ट्रात सुद्धा अनेक जनावरे बाधित झाली आहेत .  एकनिष्ठा गौसेवा फाउंडेशनचे संस्थापक सुरज यादव यांनी खामगाव मुख्याधिकाऱ्यांना याबाबत एक पत्र लिहिले असून लंपी आजाराने ग्रस्त गोवंश व जनावरांना वेगळे ठेवून क्वारंटाईन करण्याची मागणी एका पत्राद्वारे केली आहे.  खामगाव शहर व तालुका परिसरात  लम्पी आजाराने  असंख्य गौ वंशाचा मृत्यू झालेला असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर जनावरांनाही हा गंभीर लम्पी आजार झपाट्याने पसरत आहे. त्यामूळे लम्पी आजार झालेल्या गौ वंशाला  स्वतंत्र जागा उपलब्ध करून क्वारंटाइन करून त्यांच्यावर योग्य उपचार करावेत जेणे करून लम्पी ग्रस्त असलेले गौ वंशा वर योग्य उपचार होईल अशी सोय करावी व तसेच लम्पी आजार लागण झालेल्या गौ वंशांच्या मालकाला  क्वारंटाइन बाबतीत पत्र देवून अवगत करावे.  या पत्राची योग्य दखल न घे...

गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे क्षयरुग्णांना पोषक आहार व सकस आहार किटचे वाटप

Image
                                                         दि.27 सप्टेंबर 2022 गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 20 क्षयरुग्णांना पोषक आहार व सकस आहार किटचे वाटप      अलिबाग,दि.27 (जिमाका):- पनवेल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, गव्हाण येथील 20 क्षयरुग्णांना तीन महिन्याचे पोषक आहार व सकस आहार किटचे वाटप निक्षय मित्र डॉ.जेम्स डिसिल्वा यांच्या हस्ते दि.25 सप्टेंबर 2022 रोजी करण्यात आले.      यावेळी उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन करताना निक्षय मित्र डॉ.जेम्स डिसिल्वा यांनी सांगितले की, व्यवस्थित जेवण करून औषधोपचाराच्या गोळ्या खाल्या तर तुम्ही नक्कीच ठणठणीत बरे व्हाल, तुमच्या आरोग्यात लवकर सुधारणा होईल. जेवणात जास्तीत जास्त पालेभाज्या, अंडी, मासे यांचा समावेश केल्यास शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढते. त्यासाठी या गोळ्या कधीही कमी जेवण करून किंवा उपाशी पोटी घेवू नयेत. तसेच उपचार सुरू असताना मध्येच बरे वाटते म्हणून गोळ्या...

जेष्ठ पत्रकार राजेंद्र लकेष्री मुंबई अध्यक्षपदी

Image
  पत्रकार उत्कर्ष समिती मुंबई अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार राजेंद्र लकेश्री यांची निवड ---------------------------------------        पत्रकार उत्कर्ष समिती या शासन नोंदणीकृत पत्रकार संघटनेच्या मुंबई अध्यक्षपदी येथील धडाडीचे सुप्रसिद्ध जुने जाणते कार्यकर्ते, समाजसेवक, व पत्रलेखक राजेंद्र लकेश्री यांची पत्रकार उत्कर्ष समिती मुंबईचे अध्यक्ष म्हणून निवड  जाहीर करून राजेंद्र लकेश्री यांना नियुक्तीचे पत्र दिले व शाल,पुष्पगुच्छ  देऊन सन्मानित करण्यात आले.    यावेळी व्यासपिठावर पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष  डाॅ. अशोक म्हात्रे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महापालिका सभागृह माजी नगरसेवक बबन गवस, निवृत्त पोलीस अधिकारी लियाकत सय्यद, शैलेश ठाकूर, ज्ञानेश्वर कोळी, साहित्यिक व पत्रलेखक  विलास खानोलकर यांची प्रमूख  उपस्थिती होती.      यावेळी सत्कारमुर्ती लकेश्री यांनी सत्काराला उत्तर देताना माजी मंत्री रामराव आदीक यांच्याबरोबर ३५ वर्षे कार्य केले असुन कामाठीपुरा भागात जवळजवळ ५० वर्षे समाज कार्य केले आहे...

ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा

Image
  * पत्रकार उत्कर्ष समितीचा जेष्ठ नागरिक सन्मान सोहळा संपन्न * ==================== * मुंबई दिनांक १४ सप्टेंबर - श्री. राजेंद्र लकेश्री. * ==================== *पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्रच्या मुंबई शाखा व श्री. दत्तगुरु प्रतिष्ठान संस्थेने संयुक्त्त रित्या हिन्दी भाषिक दिना निमित्त दत्तगुरु प्रतिष्ठान सभागृह, कामाठीपुरा येथे साहित्यीक, वृत्तपत्रलेखक,  कवी , मुक्त्त पत्रकार, डॉक्टर, वकील इत्यादीसह बहुजन समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सन्मान करण्यात केला.   कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पत्रकार उत्कर्ष समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष. डॉ. अशोक म्हात्रे हे होते.   प्रास्ताविक भाषण श्री. दत्तगुरु प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजेंद्र लकेश्री यांनी करून संस्थेच्या कार्याची माहिती सादर केली. तर उपस्थित मान्यवर पाहुण्यांचा परिचय कवी शशिकांत सावंत यांनी करून दिला. यावेळी जेष्ठ मुक्त्त पत्रकार श्री. राजेंद्र लकेश्री यांची पत्रकार उत्कर्ष समिती मुंबई अध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र डॉ. अशोक म्हात्रे यांनी दिले याप्रसंगी निवृत्त पोलीस अधिकारी लियाकत सय्यद, महापालि...

पेण गडब मध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस अनेक घरांमध्ये शिरले पाणी

Image
आवाज कोकणचा : पेण प्रतिनिधी पेण,गडब  - अरूण चवरकर आज संध्याकाळी पेण तालुक्यातील गडब परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने गडब ग्रामस्थ भयभीत झाले, कारण दोन तास पाऊस पडताच परिसरातील बहुतांश नाले  भरून वाहू लागले व  सर्व रस्ते जलमय झाले.         बघता बघता घरात पाणी शिरून लोकांची पळापळ झाली. अनेकांना आपल्या टु व्हिलर , फोर व्हीलर गाड्या सुरक्षित ठिकाणी नेण्यात पळापळ झाली तर  अनेक प्रकारे नुकसान झाले आहे. याचे महत्वाचे कारण नाले सफाई करण्यात ग्रामपंचायतीने  कानाडोळा गेले . अनेक वर्षे अरूण चवरकर  यांच्यासह  शेतकरी, ग्रामस्थ यांनी सरपंच, वडखळ पोलिस स्टेशन, पेण प्रांत, कलेक्टर अलिबाग यांना या बाबत  निवेदने दिली तसेच  जॉन्सन गडब कंपनीने वडखळ पोलिस स्टेशन मध्ये अरूण चवरकर यांना लेखी पत्र सुध्दा दिले आहे. परंतु याबाबत ग्रामपंचायतने  वेळेत कारवाई न केल्याने आजची परिस्थिती उद्भवली असल्याचे येथील जनतेचे म्हणणे आहे.

उलवे केमिस्ट असोसिएशनने आशिष चौधरी यांचा वाढदिवस केला उत्साहात साजरा...

Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिनीधी ०५ सप्टेंबर २०२२  उलवे केमिस्ट असोसिएशनने आशिष चौधरी यांचा वाढदिवस केला उत्साहात साजरा... नवी मुंबई उलवे न्यूज चे संपादक व पत्रकार उत्कर्ष समिती चे नवी मुंबई सदस्य श्री आशिष चौधरी यांचा वाढदिवस उलवे केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षा सौ सीमा सुभाष पाटील, श्री सुभाष पाटील, अधिवक्ता सौ प्रतिभा पाटील यांनी श्री चौधरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले.  उलवे केमिस्ट असोसिएशन ही सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग कार्य करत असून येथील प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवत असते त्या अनुषंगाने बोलताना त्यांनी उलवे विभागात सिग्नल यंत्रणा व स्वीट ब्रेकर ची आवश्यकता असल्याचे सांगितले

पत्रकार आशिष चौधरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Image
आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिनिधी  दिनांक : २ सप्टेंबर २०२२   ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️  पत्रकार उत्कर्ष समितीचे नवी मुंबई सदस्य आशिष चौधरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा...         पत्रकार उत्कर्ष समिती या पत्रकारांसाठीच्या राज्यस्तरीय संघटनेचे नवी मुंबई सदस्य व धडाडीचे पत्रकार श्री आशिष चौधरी यांचा वाढदिवस आज थाटामाटात संपन्न झाला.  रायगडचे सुपुत्र लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी आज आशिष चौधरी यांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री विजय घरत व समाजसेवक श्री अनंत ठाकूर उपस्थित होते . यावेळी बोलताना रामशेठ ठाकूर यांनी श्री चौधरी यांच्या कामाचे कौतुक केले व समाजातील अन्याय व अत्याचाराविरुद्ध  लेखणीच्या माध्यमातून बाजू मांडून न्याय देण्यासाठी तत्पर रहाल अशी  अपेक्षा व्यक्त केली. 

कळंबोली येथे मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन

Image
आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिनिधी : दिनांक २ सप्टेंबर २०२२ ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ कळंबोली येथे मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन.... ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️       दिनांक ३१ ऑगस्ट रोजी वेरोना को. ॲाप हा. सो. सेक्टर १० इ रोडपाली चे यंदाचे गणेशोत्सवाचे ५ वे वर्ष. मागचे २ वर्ष कोविड महामारिमुळे गणेशोत्सव जल्लोषात साजरा करायला भेटला नाहि, मात्र ह्यावर्षी सोसायटीच्या महिलांनी विविध कार्यक्रम राबवण्याचे ठरवुन उत्सवात जोश निर्माण केला आहे. त्याचाच एक भाग म्हणुन सोसायटीच्या महिलांनी मंगळागौर व विविध पारंपरिक न्रुत्यांचे आयोजन केले होते.             ग्रामीण भागांत प्रसिद्ध असणाऱ्या मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन प कळंबोली मध्ये करण्यात आले तसेच बाल कलाकारांच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. खुप जल्लोषात ह्यावर्षीचा गणेशोत्सव साजरा होत आहे.  या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून स्त्री शक्ती फौंडेशन च्या अध्यक्ष सौ विजया कदम यांनी उपस्थिती लावली असे वेरणा सोसायटीचे सेक्रेटरी रोहन गायकवाड यांनी सांगितले. यावेळी बक्षीस वितरण ही विजया कदम यांच्या ह...