Posts

Showing posts from May, 2025
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई  प्रतिनिधी - अशोक म्हात्रे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त मराठी भाषिक एकीकरण संघटनेने केला  पोलिसांचा सन्मान ... आज दिनांक ३१/०५/२०२५ वार शनिवार रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त मराठी भाषिक एकीकरण संघटना उलवे  यांच्या वतीने आज उलवे पोलीस स्टेशन येथे महिला पोलीसांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  तसेच मराठी भाषिक एकीकरण संघटना ही आपल्याच पोलीस बांधवाना नेहमीच सहकार्य करेल अशी ग्वाही देण्यात आली... तसेच उलवे पोलीस स्टेशन चेक वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अर्जुन रजाने साहेब यांनी सुद्धा संघटनेला  मार्गदर्शन केलं.व संघटनेला शुभेच्छा दिल्या. आज महाराष्ट्र पोलीस दिवसरात्र आपल्यासाठीच कर्तव्य बजावत असतात.. ते आपल्यासाठीच म्हणून आपण सुखाने झोपत असतो.. ते पोलीस जरी असले तरी ते पहिल्यांदा ह्या मातीचे, महाराष्ट्राचे नागरिक आहेत. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पराक्रमाची यशोगाथा हीच आपल्याला प्रेरणा देणारी आहे. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इ.स. १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. ...
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई    आ.महेश बालदी यांनी केला पाऊसग्रस्त कळंबुसरे गावाचा पाहणी दौरा  .. वार्ताहर - पुजा चव्हाण काल दिनांक २५/५/२०२५ रोजी  उरण तालुक्यातील कळंबुसरे गावात पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच तेथील जनजीवन ही विस्कळीत झाले आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आज स्वतः आमदार महेश बालदी यांनी  या ठिकाणी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी काही गरजूंना तातडीने आर्थिक मदत देखील करण्यात आली .  तसेच या आपत्ती मधून पुन्हा उभं राहण्यासाठी प्रशासन सज्ज असून उरणचे तहसीलदार श्री.उद्धव कदम आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करण्याचे निर्देश दिले आहेत . मी प्रशासनाच्या संपर्कात असून उरणवासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आपत्तीच्या या काळात कोणीही एकटं नाही असे मत यावेळी आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केले. त्यावेळी तहसीलदार श्री. उद्धव कदम व कार्यकारी अभियंता श्री.जयदीप  नानोटे,  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई  आरपीआय उरण तर्फे  “भारत जिंदाबाद यात्रा” संपन्न वार्ताहर - पुजा चव्हाण भारतीय सैनिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री आद.ना.रामदासजी आठवले साहेब यांनी संपुर्ण भारतभर “भारत जिंदाबाद यात्रा” काढण्याचे आदेश जाहिर केले होते. त्या अनुषंगाने दिनांक - २५ मे २०२५ रोजी सकाळी १२ वाजता उरण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उरणमध्ये “भारत जिंदाबाद यात्रा” काढण्यात आले. सदर “भारत जिंदाबाद यात्रा” हि उरण आरपीआय कार्यालय येथून निघून डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान उरण बौद्धवाडा येथे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळ्यास अभिवादन करून यात्रा संपन्न झाली.  यावेळी आरपीआय उरण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड, शिवसेनेचे सुलेमान शेख, आरपीआय उरण उपाध्यक्ष खालीक शेख, तालुका युवक अध्यक्ष सुयोग गायकवाड, सचिव सुनील कोल्हे, शहर अध्यक्ष सूर्यकांत शिंदे, सहसचिव देवेंद्र कोळी, चारफाटा - शैलेश मूलके, बौद्धवाडा - कुणाल जाधव,  विशाल कवडे, प्रज्वल वाघमारे, मांगीरा- लाल नूर शेख, नरेश बॅगर, प्...
 आवाज कोकणचा / नवी मुंबई  कॉ . संतोष पवार व कॉ. रामदास पगारे यांचे आझाद मैदान मुंबई येथे कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी अमरण उपोषण.. वार्ताहर पुजा चव्हाण  राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत कामगार कर्मचारी यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांवर राज्याचे तत्कालीन  मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ जी शिंदे यांनी तत्कालीन राज्याचे मुख्य सचिव मनूकूमार श्रीवास्तव , वीत्त सचिव मनोज गुप्ता, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव श्री सुमंत भांगे, नगरविकास विभाग प्रधान सचिव सोनिया सेठी, आयुक्त तथा संचालक डॉ किरण कुलकर्णी असे उच्च पदस्थ आधिकार्यांच्या उपस्थित दिनांक २०/३/२०२३ रोजी विधान भवन येथे सकारात्मक निर्णय घेण्यात आले. परंतू गेले २ वर्षे होऊनही या सकारात्मक निर्णयाची अमलबजावणी न झाल्याने विविध कामगार संघटनांनी सातत्याने या बाबत सतत पाठपुरावा आमलबजावणी करिता धरणे, मोर्चे , लॉग मार्च असे विविध प्रकारे आंदोलने करण्यात आली त्या - त्या वेळी इतिवृत्त तयार करण्यात आले परंतू अपेक्षित आमलबजावणी झालीच नाही.  यामुळे या प्रदिर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारच...

पत्रकार उत्कर्ष समितीचे पुढील उपक्रम अधिकाधिक व्यापक व्हावेत - श्री. मनोज सानप ठाणे जिल्हा माहिती अधिकारी

Image
  पत्रकार उत्कर्ष समितीचे पुढील उपक्रम  अधिकाधिक व्यापक व्हावेत -  श्री. मनोज सानप ठाणे जिल्हा माहिती अधिकारी  पनवेल (प्रतिनिधी) डॉ. अशोक म्हात्रे यांचे कार्य खूपच कौतुकास्पद असून पत्रकार उत्कर्ष समितीचे पुढील उपक्रम अधिकाधिक व्यापक व्हावेत.  पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे  यांनी काल ठाणे जिल्हा माहिती कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी आपले मत व्यक्त केले.          यावेळी पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे यांनी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांना शाल व सन्मान चिन्ह भेट दिले.समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे यांनी पत्रकार उत्कर्ष समितीच्या विविध कार्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांना दिली. माध्यमाचे बदलते स्वरूप बदलत्या काळात नवनवीन माध्यमांचा उपयोग याबद्दल सखोल मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी यावेळी केले. पत्रकार उत्कर्ष समितीच्या अंतर्गत करण्यात येत असलेल्या उपक्रमाचे मनोज सानप यांनी कौतुक केले पुढील उपक्रम अधिकाधिक व्यापक व्ह...
Image
 आवाज कोकणचा  /  ठाणे  ‘ मानसिकता उपचार व मोबाईल डी एडिक्शन’ ची सुरुवात "माइन्डसेट बदलून माणूस आपले संपूर्ण आयुष्य बदलू शकतो" – आनंदश्री प्रा. डॉ. दिनेश गुप्ता कल्याण, १२ मे २०२५ (बुद्ध पौर्णिमा): बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून आनंदश्री प्रा. डॉ. दिनेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माइन्डसेट क्युर क्लिनिक’ ची भव्य सुरुवात करण्यात आली. हे केंद्र कल्याण पश्चिमेतील श्री महावीर जैन शाळेसमोर, आदर्श टायपिंग क्लासवर, मधुरा न्यूट्रिशन सेंटर येथे सुरू करण्यात आले आहे. डॉ. गुप्तांच्या मते — "अनेक मानसिक आणि वैयक्तिक समस्या आपल्या अंतरमनात दडलेल्या असतात. जेव्हा आपण आपला माइन्डसेट बदलतो, तेव्हा आपले आयुष्यही सकारात्मकपणे बदलते." या क्लिनिकमध्ये खालील सेवा उपलब्ध असतील: मानसिक समुपदेशन व मार्गदर्शन अभ्यास व करिअर कोचिंग मोबाईल/डिजिटल व्यसनमुक्ती आत्मविश्वास वाढवणे फोबिया, रिलेशनशिप इश्यूज मानसिक तणाव, न्यूनगंड व माइंड डिसऑर्डर माइंड रीप्रोग्रॅमिंग व वैयक्तिक विकासासाठी सायंटिफिक पद्धती प्रा. डॉ. दिनेश गुप्ता यांनी आजवर सुमारे पाच लाखांहून अधिक विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, महिल...
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई  " ऑपरेशन अभ्यास"    उद्या उरणमध्ये मॉक टेस्ट  नागरिकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करावे... उरण वार्ताहर / पुजा चव्हाण  या मॉक ड्रिलच्या दरम्यान शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर दुपारी ४ वाजता नागरी संरक्षण दलाचे सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल.उरण येथे आग लागल्याच्या बनावावर आधारित मॉक ड्रिल होणार असून, नागरी संरक्षण दल, वैद्यकीय पथक व इतर आपत्कालीन सेवांकडून बचावकार्य, शोध मोहिमा व नागरिकांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सायंकाळी उरण शहरातील काही भागांमध्ये ५ मिनिटांसाठी ब्लॅकआउट (प्रकाशव्यवस्था बंद) करण्यात येणार आहे. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मॉक ड्रिल ही केवळ पूर्वतयारीचा भाग असून कोणतीही खरी आपत्ती उद्भवलेली नाही, हे लक्षात घ्यावे. जिल्ह्यात इतर कोणत्याही ठिकाणी मॉक ड्रिल आयोजित करण्यात आलेली नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. युध्दजन्य परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी खालील काळजी  घ्यावी. १. प्रशासनामार्फत हवाई हल्याच्या वेळी कमी जास्त आवाजात...

मी अजूनही शेकाप मध्येच. महाविकास आघाडीतून बाहेर पडलोय.... जे एम म्हात्रे

Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई मी अजूनही शेकाप मध्येच. महाविकास आघाडीतून बाहेर पडलोय.... जे एम म्हात्रे पनवेल.. .मिलिंद खारपाटील  महाविकास आघाडीचा धर्म घटक पक्षांनी आघाडी धर्म पाळला नाही  त्यामुळे उरण सह रायगड मधील शेकाप च्या चार सीट पडल्या. आम्ही पक्षाच्या उमेदवाराविरोधी लढलो नाही. त्यामुळे गद्दार नाही. ७४ वर्षांच्या आयुष्यात आतापर्यंत शेकाप बरोबर एकनिष्ठ राहिलो. ४७ वर्ष शेकाप कार्यकर्ता म्हणून काम केले. शेतकरी आंदोलनात सहभाग घेतल्याने पोलिसांचा मार खावा लागला.अनेक विकास कामे केली.जनतेची लढाई प्रामाणिक राहून लढलो.मात्र आता काही जण आम्हाला विचारात न घेता शेकाप च्या मीटिंग ला सुद्धा बोलावत नाही . मी उद्या माझ्या कार्यकर्त्यांची मीटिंग घेऊन सर्वानुमते जो निर्णय होईल तो निर्णय मी जाहीर करीन.असे उद्गार शेकाप नेते पनवेल चे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांनी जाहीर केले. पनवेल मधील मार्केट यार्ड मधील त्यांच्या कार्यालयात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.

मराठी भाषिक एकीकरण संघटना उलवे चा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न ...

Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई उलवे - प्रतिनिधि  मराठी भाषिक एकीकरण संघटना उलवे चा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न ... नवी मुंबई मधील उलवे विभागातील मराठी भाषिकांना एकत्र आणण्यासाठी पत्रकार उत्कर्ष समितीचे पनवेल तालुका सदस्य श्री नरेंद्र देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी कंबर कसली असून उलवे मध्ये वाढत चाललेल्या परप्रांतीय व इतर भाषिकांमुळे येथील स्थानिक जनता व उलवे मधील मराठी रहिवाशी यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परप्रांतीयांनी उलवे मध्ये मोठ्या प्रमाणावर  दुकाने , आठवडे बाजार यासह भंगारची दुकाने या सारख्या व्यवसायात बस्तान बसवले असून येथील स्थानिक आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून उलवेमध्ये स्थायिक झालेल्या मराठी माणसावर अन्याय होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हाच धागा पकडून येथील युवक  नरेंद्र देशमुख, अजय हेगडकर, दिनेश पवार,स्वप्नील घाडगे, वैभव शेंडगे,मनोज चंद्रमोरे,अजित शेंडगे, विकास खंडागळे, संदीप लवटे,मनोज कोळी, सुनील कोळी, वैभव निर्भवणे, बाबाजी कोकाटे, हितेश शिंगरे आदींनी  एकत्र येऊन मराठी भाषिक एकीकरण संघटना स्थापन केली व उलवे विभागातील ...