Posts

Showing posts from June, 2025
Image
 आवाज कोकणचा / रायगड  अलिबाग - बातमीदार राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक VIII – 1982 बॅचचा अविस्मरणीय गेट-टुगेदर अलिबागमध्ये संपन्न अलिबाग राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्रमांक VIII मधील 1982 साली भरती झालेल्या जवानांनी आपली प्रदिर्घ सेवा पूर्ण करुन अधिकारी पदावर सेवानिवृत्त झालेले , तब्बल 43 वर्षे सहा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अलिबाग येथे एक अविस्मरणीय स्नेहसंमेलन (गेट-टुगेदर) नुकतेच साजरे केले. या कार्यक्रमाचे नियोजन अलिबाग दर्शन टीम यांच्या सहकार्याने रुक्मिणी कुंज रिसॉर्ट, सातीर्जे, बोंबटकरपाडा, अलिबाग येथे करण्यात आले होते. शांत आणि निसर्गरम्य परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा देताना सर्वांनी एकमेकांना प्रेमाने मिठ्या मारून आपुलकीने भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत भावपूर्ण वातावरणात झाली. सदर कालावधीत दिवंगत झालेल्या एकूण 16 सहकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या स्मृतींना उपस्थितांनी शांततेत व आदराने उजाळा दिलाया स्नेहसंमेलनास 1982 बॅचचे विविध ठिकाणाहून सेवानिवृत्त झालेले एकूण 14 सेवानिवृत्त पोलीस अध...
Image
 आवाज कोकणाचा / रायगड संतोष गायकवाड यांची पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल पत्रकार उत्कर्ष समिती चे पेण तालुका अध्यक्ष अरुण चवरकर यांनी केला सत्कार पेण - अरूण चवरकर उरण पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले संतोष गायकवाड यांची मुळ गाव कळंबुसरे उरण यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याचे अरूण चवरकर यांना समजताच उरण पोलिस स्टेशन मध्ये भेट घेऊन सत्कार करण्यात आला कारण संतोष गायकवाड यांनी काही वर्ष पनवेल ट्राॅफिक पोलिस म्हनून चांगली कामगिरी केल्याने वरिष्ठांनी कौतुक केले आहे त्यानंतर क्राईम ब्रांच बेलापूर येथे अनेक वर्षे कौतुकास्पद कामगिरी करून पोलिस खात्यात आपल नाव लौकीक केले.  आजही परराज्यातून आरोपी शोधून आणायचे असेल तर गायकवाड यांच्यावर कामगीरी सोपवली जाते आणि ते जबाबदारी पूर्ण करून दाखवतात असे उदगार सत्कार करताना उरण चे पोलिस निरीक्षक मिसाळ यांनी पत्रकारांना सांगितले.  संतोष गायकवाड यांच एक वैशिष्ट् त्यांनी अनाथ मुलींना दत्तक घेऊन शिक्षण देऊन लग्न लावून दिलं एक शांत स्वभाव म्हनून ओळख सत्कार प्रसंगी,ए पी आय खाडे, दैनिक सकाळ चे महेश भोईर, विकास गुरसाळे, उपस्थित होते ...
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई  पत्रकार उत्कर्ष समितीच्या उरण तालुका पदाधिकाऱ्यांनी घेतली शासकीय अधिकाऱ्यांची भेट.. . जनतेच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा... उरण -  पूजा चव्हाण पत्रकार उत्कर्ष समिती उरण तालुका पदाधिकरी व सदस्यांनी तालुक्यातील तहसील कार्यालय, उरण पोलीस ठाणे, गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात भेट देत समितीच्या कार्याची माहिती दिली व जनतेच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यासाठी निवेदन दिले . या निवेदनाव्दारे त्यांनी प्रशासना सोबत विविध सामाजिक व माहितीपत्र उपक्रमामध्ये भाग घेत असल्याचे सांगितले. तसेच निवेदनात महिला सक्षमीकरण,  महिला अधिकार , जन जागृती, महिला व विद्यार्थ्यांनीसाठी कार्यशाळा आणि ग्रामीण भागात पत्रकारितेच्या माध्यमातून विकासात्मककाम करणे किती आवश्यक आहे याची माहिती देत  प्रशासन व जनता यांच्यामध्ये दुवा बनून काम करण्याचा उद्देश असल्याचे म्हटले. प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांंदा लावून स्त्री उभी आहे. आर्थिक स्वातंत्र्य अनुभवायला शिकली आहे. तिच्या गुणांना, मतांना घरात आणि समाजातही किंमत आहे. विविध क्षेत्रे तिने पादक्रां...

पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र यांच्या वतीने पनवेल एस टी आगारातून अनियमित सुटणाऱ्या एस टी बस वेळेवर सुटण्यासाठी निवेदन.....

Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई  पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र यांच्या वतीने पनवेल एस टी आगारातून अनियमित सुटणाऱ्या एस टी बस वेळेवर सुटण्यासाठी निवेदन..... प्रवाशांचे हाल थांबणार अधिकाऱ्यानी दिला सकारात्मक प्रतिसाद... प्रतिनिधी - पनवेल  सध्या पावसाळी वातावरण आहे. अनेक रस्ते खराब झाले आहेत. यातच पनवेल एस टी आगारातून एस टी बस वेळेवर सुटत नाही अशी प्रवाशांची तक्रार असल्याने पत्रकार उत्कर्ष समिती च्या कार्यकारिणी मंडळाने पनवेल आगार व्यवस्थापक अश्विनी खाबडे आणि स्थानकप्रमुख ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भेट देऊन निवेदन दिले. याचबरोबर पनवेल.. आवरा बस वेळेत सुटत नसल्याने अनेक प्रवासी नाराज आहेत असेही सांगितले.आणि यापुढे सर्व बस वेळेवर सोडण्याची विनंतीवजा मागणी केली. आगार व्यवस्थापक आणि स्थानकप्रमुख यांनी होकार दिला. राज्यातील अनेक समस्यांवर ,विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी, समस्या सोडविण्यासाठी पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र यांच्याकडे जनता मोठ्या आशेने पाहत आहे. आणि सकारात्मक दृष्टीने त्यांच्या अडचणी समस्या सोडविण्याचे काम केले जाते. अहिल्याबाई होळकर योजनेतून पाचवी ते बारावी शिक्...
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई द्रोणागिरी मध्ये शाब्दिक बाचाबाची नंतर फिल्मी स्टाईल मध्ये हाणामारी.... उरण - पूजा चव्हाण द्रोणागिरी हि सिडकोची वसाहत असून उरण तालुक्यातील विकसित असा परिसर आहे. त्या मुळे दिवसेंदिवस येथील मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.वसाहती, मोठमोठे टॉवर, बॅंका, ऑफीस, आठवडा बाजार, दवाखाने, अनेक प्रकारचे छोटे मोठे मॉल्स यांच्या वाढत्या संख्येमुळे आज द्रोणागिरी नोड एक महत्त्वाचे ठिकाण झाले आहे. मुंबई चे नवे उपनगर म्हणून द्रोणागिरी नोड उदयास येत आहे.     मुंबई शहराची वाढती लोकसंख्या वाढती महागाई यामुळे मुंबई शहरात राहणे सर्वसामान्य माणसाला परवडत नाही.त्यात मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेला उरण तालुका हा अटल सेतू उरण नेरूळ लोकल रेल्वेमुळे काही अंतरावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे नागरिकांनी उरण द्रोणागिरी नोड ला सर्वाधिक पसंती दिली आहे.       वाढत्या लोकसंख्येमुळे द्रोणागिरी नोड मध्ये पाणी, अनधिकृत टपऱ्या,डम्पिंग ग्राऊंड, अजून ही सिग्नल व्यवस्था नाही. आतापर्यंत द्रोणागिरी मध्ये अनेक वाहनांचे अपघात होऊन नागरिकांच्या जीवावर ही ...
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिनीधी - उरण  पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप  पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र या पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या समितीने आपली सामाजिक बांधिलकी जपत रायगड जिल्हा परिषद शाळा नवघर उरण येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.  पत्रकार उत्कर्ष समिती उरणचे सदस्य श्री विशाल डाके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिला उत्कर्ष समिती सदस्य जयश्री चव्हाण , शिवसेना शाखाप्रमुख श्री. अविनाश म्हात्रे , श्री. ज्ञानेश्वर तांडेल, उपसरपंच श्री. विश्वास तांडेल , ज्येष्ठ नागरिक श्री. मोतीराम डाके, शुभम पाटील ,  सौरभ घरत, मयूर डाके, शिव मयूर डाके, अंश विशाल डाके  यांची उपस्थीती होती.  कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवघरचा शिक्षकवृंद मूख्याध्यापिका सौ. उषा राजेंद्र गावड , श्री. गणेश पांडुरंग गावंड, श्री. प्रकाश परशुराम जोशी, श्री. प्रसाद तुलशीरा...
Image
आवाज कोकणचा / नवी मुंबई , प्रतिनिधी  विशाल डाके यांचा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा  पत्रकार उत्कर्ष समितीचे उरण सदस्य श्री विशाल डाके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा नवघर येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून साजरा करण्यात आला . या कार्यक्रमासाठी पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे , डॉ.  जयश्री चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर शिवसेना शाखाप्रमुख श्री. अविनाश म्हात्रे , श्री. ज्ञानेश्वर तांडेल, उपसरपंच श्री. विश्वास तांडेल , ज्येष्ठ नागरिक श्री. मोतीराम डाके, शुभम पाटील ,  सौरभ घरत, मयूर डाके, शिव मयूर डाके, अंश विशाल डाके  यांची उपस्थीती होती.  कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवघरचा शिक्षकवृंद मूख्याध्यापिका सौ. उषा राजेंद्र गावड , श्री. गणेश पांडुरंग गावंड, श्री. प्रकाश परशुराम जोशी, श्री. प्रसाद तुलशीराम म्हत्रे, श्री. अनिल वसंत म्हात्रे , सौ. सरीता गौतम गोरे यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.  यावेळी शाळेतील साधारण 150 विद्यार्थ्या...
Image
 आवाज कोकणचा नवीमुंबई  कवयित्री रुपाली राजेश शिंगे ( गायकवाड ) यांच्या 'सूर्याची सावली 'या काव्यसंग्रहास देविदास दशरथ दुन घव स्मृती काव्य गौरव पुरस्कार पुणे येथे वैशाख वादळ वारा काव्य महोत्सव -२०२५   ग्रामीण कवी चंद्रकांत मोतीराम जोगदंड आयोजित भव्य खुले कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा दिनांक ८/ ६ /२०२५ रोजी पुणे येथील  एस. एम जोशी फाऊडेशन  सभागृह नवी पेठ येथे  आयोजित करण्यात आला  होता . सोलापूरचे सुप्रसिद्ध साहित्यिक मा .श्री .डॉ .श्रीपाल सबनीस (संमेलनाध्यक्ष, ८९वे  अ. भा. म .सा .सं. पिंपरी पुणे )  व  मा. श्री.  बबन  पोतदार  (ज्येष्ठ  ग्रामीण साहित्यिक) यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला .  त्या  सोहळ्यात मूळच्या सोलापूर परंतु वास्तव्यास ऐरोली नवीमुंबई  येथे असणाऱ्या कवयित्री रुपाली  शिंगे यांच्या  'सूर्याची सावली ,काव्यसंग्रहास   देविदास दशरथ दुनघव स्मृती काव्य गौरव पुरस्कार      मिळाला आहे .  या सोहळ्यात राज्यभरातील साहित्यिकांच्या विविध साहित्य  कृतीं...
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई  प्रतिनिधी  महिला उत्कर्ष समितीच्या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसाद वटपौर्णिमेनिमित्त झाडे लावून घेतला नवीन संकल्प... पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तराय पत्रकार संघटनेच्या अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांनी राज्यभरात विविध ठिकाणी वटपौर्णिमा सणा निमित्ताने उपलब्ध जागेत एक झाड लावण्याचा संकल्प घेतला असून  अनेकांनी या दिवशी झाडे लावली व पुढेही अशाच पद्धतीने वृक्षारोपण करणार असल्याचे मनोगत अनेक महिला सदस्य व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे . महिला उत्कर्ष समिती प्रदेश कार्याध्यक्ष श्रुती उरणकर , उपाध्यक्ष सौ आरती पाटील,   नवी मुंबई तुर्भे विभाग अध्यक्ष सौ वंदना अंबवले व उपाध्यक्ष सौ. रेखा पंडित ,  ठाणे पदाधिकारी सौ मानसी मोने,  बुलढाणा पदाधिकारी डॉ. नंदिनी रींधे यांच्यासह राज्यभरात विविध ठिकाणी अशा पद्धतीचे कार्यक्रम राबविले गेले असून भविष्यात सुद्धा वृक्षारोपण करणार असून जलवायु परिवर्तन व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी खारीचा वाटा उचलणार असल्याचे म्हटले आहे.