Posts

Showing posts from January, 2024
Image
  आवाज कोकणचा नवी मुंबई हेमंत कोळी दिवाळे गावात रंगणार गजर भजनांचा  *नवी मुंबई :* काळाच्या ओघात सोशल मीडियाच्या प्रगतीमुळे आज पारंपरिक भजन कीर्तनाचे महत्त्व कमी झाले असले तरी, सर्वसामान्यांची आध्यात्मिक ओढ लक्षात घेता व वारकरी संप्रदाय मंडळांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नवी मुंबई येथील दिवाळे गावातील रेनबो फ्रेंड सर्कल युवा सामाजिक संस्थेच्या वतीने शनिवार ( ता. ०३ ) फेब्रुवारी रोजी 'भव्य संगीत सांप्रदायिक भजन' स्पर्धेचं आयोजन करण्यात आले असून, मुंबई, ठाणे व रायगडसह नवीमुंबई परिसरातील सुप्रसिद्ध भजन मंडळांनी आपला सहभाग नोंदवला आहे. यावेळी विजेत्या तीन भजनी मंडळांना रोख पारितोषिक व पाच सर्वोत्तम वादकांसाठी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.    टाळ, मृदूंग आणि पेटीच्या साथीने सादर होणारी भजनं, अभंग ही महाराष्ट्राची ऐतिहासिक ओळख आहे. मात्र शहरीकरणाच्या ओघात पारंपरिक भक्तीसंगीत, भजनं आणि अभंग आजवर केवळ मौखिक स्वरुपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत होत आले आहेत. सामाजिक जडणघडणीमध्ये या कलेचा मोठा वाटा आहे. या ठेव्याची पुढील पिढीला ओळख व्हावी व अखंडित परंपरेचं जतन...
Image
  आवाज कोकणचा / ठाणे संवाददाता नवसमाज विद्यामंदिर मानिवली में परीक्षा पर चर्चा और करियर गाइडेंस का सफल आयोजन भिवंडी - मानिवली 29.01.24 नवसमाज विद्यामंदिर मानिवली में गुरुकुल एज्युकेशन चेरिटेबल संस्था द्वारा दसवीं के विद्यार्थियों हेतु करियर गाइडेंस शिबिर का आयोजन किया किया । मार्गदर्शक के तौर पर प्रो डॉ दिनेश गुप्ता - आनंदश्री आमंत्रित थे। उन्हीने दसवीं और बारहवीं के बाद की दिशाएं राहें के बारे में गहराई से मार्गदर्शन किया।  इसी के साथ साथ आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी के परीक्षा पर चर्चा का लाईव्ह टेलिकास्ट का भी लाभ इसी कार्यक्रम में विद्यार्थियों ने लिया। इस कार्यक्रम को सफल बनाने में प्राचार्या - पाटिल मेम का विशेष सहभाग रहा, तथा प्रो वैभव ठाकरे सर, विनोद सर, जितेश पाटिल सर का मुख्य योगदान रहा। इस कार्यक्रम में विद्यार्थियों ने करियर से सम्बन्धित कई सवाल पूछे जिसका वहीं पर निवारण किया गया।
Image
आवाज कोकणचा / प्रतिनीधी नवी मुंबई.    महिला उत्कर्ष समितीतर्फे आरोग्य तपासणी, मार्गदर्शन व हळदीकुंकू समारंभ संपन्न पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या नवी मुंबई अध्यक्ष सौ सुजाता दिनेश कडू यांनी पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उत्कर्ष समितीच्या  सदस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी मार्गदर्शन शिबिर व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते.  आयएमसी या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपनीच्या प्रतिनिधी सौ आशा चव्हाण , सौ सपना जोशी व आकाश यांनी उपस्थित महिलांना आरोग्यविषयक माहिती दिली व आपण आजारी होऊच नये यासाठी घ्यावयाची काळजी याचेही मार्गदर्शन केले . या कार्यक्रमासाठी महिला उत्कर्ष समितीच्या नवी मुंबई सदस्य सौ श्वेता तांडेल, सौ . सोनिया कडू, सौ. हेमा कडु , सौ आरती कडू, सौ. नयना तांडेल यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या . हळदीकुंकू समारंभाच्या निमित्ताने उपस्थित महिलांना  सुजाता कडू यांनी भेटवस्तू देत सलोख्याचे संबंध निर्माण करण्याचे आवाहन केले तसेच महिला उत्कर्ष समिती सोबत अधिकाधिक ...
Image
आवाज कोकणचा / नवी मुंबई    कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोण येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न   विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञानाबरोबरच समाजातील विविध घटनांची माहिती मिळावी तसेच उत्तम आरोग्य रहावे यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रत्येक विद्यालयात करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.   त्या आदेशास अनुसरून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय त्रिकोण उरण येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे  यानी विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजार,  डोळ्यांचे आजार,  मधुमेह,  हृदयरोग यासारखे रोग व प्राथमिक उपचार याविषयी सखोल माहिती  दिली.   तसेच प्रगत तंत्रज्ञानामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली असल्यामुळे त्या विषयाची माहिती सुद्धा डॉ. म्हात्रे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली  ज्यामध्ये इंटरनेटचा वापर करत असताना घ्यावयाची काळजी व अशा प्रकारचा गुन्हा घडल्यास त्याबाबत तक्रार कुठे करावी याचीही माहिती देण्यात ...
Image
आवाज कोकणचा / सिंधुदुर्ग अशोक म्हात्रे  महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षा दीपा ताटे यांनी सहकाऱ्यांसह केला बालिका दिन साजरा.. पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा सौ. दीपा ताटे यांच्यासह कुडाळ तालुका उपअध्यक्षा सुस्मिता राणे व ईतर सहकाऱ्यांनी राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषद शाळा ओरोस येथें बालिका विद्यार्थिनीं सोबत संवाद साधत हितगुज व गप्पागोष्टी करून त्यांची मने जिंकली.  यावेळी ठेका धरत त्यांच्या सोबत नाचगाणी केली.  या कार्यक्रमामुळे बालिका अतिशय आनंदी झाल्या. दीपा ताटे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्याचीच प्रचिती आज पुन्हा आली. 
Image
  आवाज कोकणचा / सिंधुदुर्ग अशोक म्हात्रे महिला उत्कर्ष समिती कोकण अध्यक्षा ज्योतीका हरयान यांनी सहकाऱ्यांसह केला बालिका दिन साजरा.. पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या कोकण विभागीय अध्यक्ष ज्योतीका हरयाण यांच्यासह जिल्हा सदस्या स्वरदा खांडेकर व ईतर सहकाऱ्यांनी समाजाप्रती महिला उत्कर्ष समितीचे योगदान अधोरेखित करीत मारुती विद्या मंदिर जानवली येथील अंगणवाडीला भेट देऊन तेथील मुलींसोबत बालिका दिन साजरा केला.  येथील अंगणवाडी सेविका माधुरी लाड यांच्याशी संवाद साधून तेथील कन्या विषयी माहिती करून घेतली.  सर्व मुलांकडून स्वागत करण्यात आले.  आजच्या या दिनाचे महत्व साधत उपस्थित सर्व मुलांना बिस्कीट पुड्याचे वाटप करण्यात येऊन त्यांना गोड शुभेच्छा देण्यात आल्या .  मुलींनी गोड गाणी गाऊन दाखवली तसेच छान छान गोष्टी सांगितल्या. त्यांचे बालिश हाव भाव बघण्यासारखे होते. सर्व वातावरण आनंदीत होते.त्यावेळी उपस्थित जिल्हा सदस्य स्वरदा खांडेकर तसेच पालक वर्ग उपस्थित होता.अशाप्रकारे राष्ट्रीय बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
Image
  आवाज कोकणचा / नवी मुंबई अशोक म्हात्रे श्री धन्वंतरि कॉलेज ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी में नेताजी सुभाषचंद्र बोस की जयंती का आयोजन श्री धन्वंतरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी में नेताजी सुभाष चंद्र बोस की जयंती पराक्रम दिवस के रूप में मनाई गई। इस अवसर पर नेताजी पर निबंध लेखन और भाषण प्रतियोगिता रखा गया जिसमें कई विद्यार्थियों ने भाग लिया।  नेताजी पर उनके बारे में एक डॉक्युमेंट्री भी  दिखाइ गई। कार्यक्रम की प्रभारी दिव्या थीl कॉलेज के प्रिंसिपल डॉ. धर्मेंद्र दुबे ने बताया कि नेताजी का योगदान आजादी की लड़ाई में भुलाया नहीं जा सकता।  तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूँगा, दिल्ली चलो, जय हिंद जैसे नारे नेताजी के ही हैं। कॉलेज के ट्रस्टी अध्यक्ष डॉ. एन डी जीवनी और सचिव डॉ. दिनेश सुतारिया जी ने नेता जी को याद किया और बताया कि नेताजी के साहस और उनके पराक्रम की वजह से आजादी की लड़ाई में उनका अहम योगदान रहा, इसलिए आज पराक्रम दिवस के रूप में मना रहे।
Image
आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठातर्फे भूजल आणि पर्यावरणीय धोका व्यवस्थापनावर यशस्वी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन" पनवेल, नवी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाने 20 ते 21 जानेवारी, 2024 या कालावधीत "सामाजिक वैज्ञानिक आणि तांत्रिक दृष्टीकोनातून भूजल आणि पर्यावरणीय धोका व्यवस्थापनाची आव्हाने सोडवणे" या विषयावर "INC-IAH आणि CSMU आंतरराष्ट्रीय परिषद" यशस्वीरित्या संपन्न झाली . 20 जानेवारी 2024 रोजी झालेल्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रा. (डॉ.) ए.डी. सावंत, राजस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि सन्माननीय अतिथी प्रा. (डॉ.) एनजे पवार व सन्माननीय पाहुणे उपस्थित होते. प्रो. (डॉ.) ए.के. सिन्हा. संमेलनाचे समन्वयक डॉ.आर.पी. सिंह कुशवाह यांनी कार्यक्रम सुरळीत पार पाडला. कुरुक्षेत्र विद्यापीठाचे डॉ. बी.एस. यांच्यासह प्रख्यात शास्त्रज्ञांनी उद्घाटनाच्या दिवशी अंतर्दृष्टी प्रदान केली. चौधरी, भारत सरकारच्या भूविज्ञान मंत्रालयाचे सल्लागार डॉ. ओ.पी. मिश्रा, ब्रिटीश भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे ज्येष्ठ जलशास्त्रज्ञ डोनाल्ड जॉन मॅकअलि...

राष्ट्रीय सुरक्षा रस्ता अभियानांतर्गत उरण वाहतूक शाखेमार्फत मोफत वैद्यकीय तपासणीच्या आयोजन.

Image
  राष्ट्रीय सुरक्षा रस्ता अभियानांतर्गत उरण वाहतूक शाखेमार्फत मोफत वैद्यकीय तपासणीच्या आयोजन. आवाज कोकणचा/पूजा चव्हाण                राष्ट्रीय सुरक्षा रस्ता अभियान हे १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी पर्यंत अभियान राबवण्यात येणार आहे.या अभियानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाहतुकीचे नियम, लघुचित्रपट, वैद्यकीय तपासण्या, अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजन करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.           या अभियानांतर्गत उरण वाहतूक शाखेमार्फत १७ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता उरण मधील अल्ट्राटेक कंपनी येथे हा वैद्यकीय कॅम्प भरवण्यात आला होता.हा कार्यक्रम नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त माननीय काकडे साहेब यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रीय सुरक्षा रस्ता अंतर्गत येथे वैद्यकीय तपासणीचा कॅम्प ठेवण्यात आला होता.         या कॅम्पमध्ये नेत्र तपासणी,उच्च रक्तदाब, दंतचिकित्सा, मधुमेह, तपासणी अशा प्रकारच्या विविध तपासण्या यामध्ये घेण्यात आल्या होत्या.या वैद्यकीय तपासणी मध्ये एकूण २२८ वाहतूक चालकांनी याचा लाभ घेत...
Image
  आवाज कोकणचा / नवी मुंबई हेमंत कोळी  केंद्र सरकारकडून २२ जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर     केंद्र सरकारने अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने ही ऑर्डर काढली आहे. ऑफिस मेमोरँडमनुसार, कर्मचार्‍यांच्या भावना आणि विनंती लक्षात घेऊन, केंद्र सरकारने सर्व केंद्र सरकारी कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक येथे अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.      २२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत आस्थापनेला सुट्टी असेल. देशभरात २२ जानेवारीला दिवाळी साजरी केली जाणार आहे. लोकांमध्ये मोठा उत्साह आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांनी यानिमित्त आधीच सुट्टी जाहीर केली आहे. आता केंद्र सरकारनेही सर्व कार्यालये आणि संस्थांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. लोकांना प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता यावे यासाठी ही अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.    राम...
Image
आवाज कोकणचा / नवी मुंबई प्रतिन्धी मुंबई मधील छत्रपती मर्दानी आखाड्याचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश... १४ जानेवारी रोजी पुणे येथे झालेल्या २०२४-२०२५ मर्दानी खेळ खुल्या राज्यस्तरीय स्पर्धेत २० आखाड्यांनी सहभाग घेतला होता ह्यामध्ये मुंबई येथील छत्रपती मर्दानी आखाडा यांनी उत्तेर्जनात बक्षीस मिळवत यश संपादन केले  आहे, ह्यामुळे प्रत्येक स्थरातून ह्या आखाड्याचे, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक होत आहे लाठी काठी, व लढत ह्या प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळवत घवघवीत असे यश संपादन केले त्यामूळे छत्रपती मर्दानी आखाडास पारंपारिक ढाल व सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले व स्पर्धेमध्ये सहभागी मावळे,रणरागिणीना राज्यस्तरीय प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.. ह्या मधे उत्तम चव्हाण, श्रेयस पोवार,सलोनी कुबल, सानिध्य निकम, अजिंक्य साळुंखे,अक्षता आग्रे,मोनिका इंगळे,समर्थ भंडारी,अनया मगदूम,मृदुला खाडे या मावळ्याचा,रणरागिणीनाचा समावेश होता... ह्या स्पर्धेसाठी छत्रपती मर्दानी आखाड्याचे संस्थापक प्रशिक्षक संतोष संकपाळ यांचे मार्गदर्शन लागले वस्ताद संतोष संकपाळ हे छत्रपती मर्दानी आखाड्याच्या माध्यमातून गेली १६ ...
Image
  आवाज कोकणचा / नवी मुंबई हेमंत कोळी  शिवडी-न्हावाशेवा पुलावर धावली चक्क रिक्षा नवी मुंबई :* पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. २१.८ किमी लांबीचा हा पूल फक्त सर्वात मोठाच नाही तर तर समुद्रात उभारण्यात आलेला सर्वात लांब पूल आहे. शनिवारी या पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर हौशी मुंबईकरांनी एकच गर्दी केली होती. यावेळी पुलावर लोक सेल्फी घेण्यासाठी थांबल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबईकरांकडून नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे अनेक फोटो, व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.   यामुळे आता मुंबई पोलिसांनीही अशा बेजबाबदार नागरिक आणि वाहन चालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अटल सेतूवर चक्क एक रिक्षा धावताना दिसली आहे. एक्सवर एका युजरने रिक्षा पुलावर धावत असल्याचे फोटो शेअर केले आहेत. यानंतर नेटकरी रिक्षा पुलावर पोहोचलीच कशी? अशी विचारणा करत आश्चर्य व्यक्त करत आहेत. यावेळी अनेकांनी म...
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई अशोक म्हात्रे आमचा कोळीवाडा अप्रतिम नाटक रसिकांच्या मनोरंजनासाठी दाखल.... दत्ता भोईर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आमचा कोळीवाडा हे नाटक शनिवार दिनांक 13 जानेवारी 24 रोजी आद्यक्रांतीविर वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहातून प्रथम प्रयोगाने नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी दाखल झाले आहे. या नाटकाची मांडणी करताना दत्ता भोईर यांनी आगरी कोळी समाजातील रुढी परंपरा व बोलीभाषा यांची योग्य सांगड घातली असून प्रेक्षकांच्या पसंतीस येयील अशी मांडणी आहे. कालानुरूप बदलती जीवनशैली, इतर भाषांचा वाढत चलेलेला प्रभाव यामुळे पारंपरिक वेशभूषा, बोलीभाषा व व्यवसाय यावर परिणाम होऊन या सर्वच गोष्टी नामशेष होतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हाच धागा पकडून दत्ता भोईर यांनी या सर्वच गोष्टी पुढील पिढीपर्यंत पोचण्यासाठी आधुनिक विज्ञानासोबत सांगड घालून हा नाट्य संच निर्माण केला आहे.  या कार्यक्रमासाठी आगरी कोळी समाजातील नामदेव भगत , जयेंद्र खुणे, रामदास संधे, जस्टिस चंद्रलाल मेश्राम, डॉ. अशोक म्हात्रे , ॲड. चंद्रकांत मढवी, अक्षता म्हात्रे, जया दळवी, नामदेव पाटील यांच्यासह अनेक मान्...