Posts

Showing posts from April, 2025
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई जासई दास्तान फाटा उड्डाण पुलावर पुन्हा अंकिताचा अपघातात मूत्यू. ( उरण प्रतिनिधी -  पूजा चव्हाण )    उरण तालुक्यातील अपघातांची मालिका काही संपता संपत नाही. पुन्हा तेच तेच होत आहे .यमाचे बोलवणं चालूच आहे.     उरण मधील रस्ते आणि त्यावरील अपघात हे समीकरण काही  बदलतच नाही. दिनांक २९ एप्रिल हा काळा दिवस उजाडला आणि पुन्हा एकदा दास्तान फाटा उड्डाणपूलावर भीषण अपघात झाला. यामध्ये  बळी गेली अंकिता मयेकर हि 29 वर्षीय तरुणी हिचा जागीच मृत्यू झाला. ट्रेलर ने जोरदार धडक दिल्याने अंकिताच्या डोक्याला जबर मार बसला. आणि तिचा जागीच मृत्यू झाला.      अंकिता ही नवी मुंबईत नोकरीनिमित्त  रेल्वे ने जात असे पण तीला थोडा उशीर झाल्याने तीची रेल्वे चुकली आणि काळाने नेमके हेच हेरले, तिला वेळेवर पोहोचण्यासाठी तिने मोटरसायकल काढली आणि हाच निर्णय तिचा जिवघेणा  ठरला. हा प्रवास तिचा आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरला.      जेएनपीटी,ओएनजीसी,बी पीसीएल सगळे मोठमोठे प्रकल्प उरण मध्ये आहेत पण त्याचा उपयोग  जनतेसाठी नाह...
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई  उरण तालुक्यातील नवघर गावचे हेमंत कडू यांना हिप्नोथेरपीमध्ये डॉक्टररेट पदवी प्रदान. वार्ताहर उरण पुजा चव्हाण          अयोध्या, २७ एप्रिल २०२५ अयोध्येतील पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठात आज झालेल्या विशेष समारंभात हेमंत कडू यांना हिप्नोथेरपी या क्षेत्रात "डॉक्टररेट" म्हणजेच मानद पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या हिप्नोथेरपी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत विद्यापीठाने त्यांना हा सन्मान दिला आहे.        मानसिक आरोग्य आणि हिप्नोथेरपीच्या माध्यमातून समाजासाठी केलेल्या कार्याची प्रशंसा यावेळी विद्यापीठ प्रशासनाने केली. यावेळी मुख्य अतिथी पुर्व कुलपति रानी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विश्वविद्यालय झांशी पद्मश्री डाॅ.अरविंद कुमार,कुलपति प.दिनदयाल उपाध्याय हिंदी विध्यापीठ अध्यक्षता डाॅ. इन्दु भुषण मिश्रा,सुप्रसिध्द कथा वाचिका वृन्दावन धाम मथुरा मुख्य वक्ता सुश्री दिपा मिश्रा,राष्ट्रीय पर्यावरणविद आणि वर्ड रेकाॅड धारी बागबहरा जिल्हा महासमुंद(छत्तीसगढ) विशिष्ट अतिथि डाॅ.विश्वनाथ पाणिग्रहि या मान्यवरांच्य...
Image
आवाज कोकणचा / रायगड  पेण    गावच्या रस्त्यासाठी  तरुणांची एकजूट... वार्तावर पूजा चव्हाण वढाव ते घोडा बंदर व लाखोले ह्या रस्त्याचे काम मागील वीस, पंचवीस वर्ष कितपत पडलेले आहे तसेच वढाव ते लाखोले रस्त्याला डांबरीकरण करून चौदा ते पंधरा वर्षे झाली तरी अजून सदर रस्त्याचे डांबरीकरण काम केलेले नसल्याकारणाने या रस्त्यावर खूप मोठे, मोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच या रस्त्यावरून प्रवास करणारे वयोवृद्ध व्यक्ती व शाळेय विद्यार्थी तसेच उदरनिर्वाहासाठी शहराकडे जाणारे नोकरवर्ग यांना गावाकडे येणारे - जाणारे वाहन बस सेवा नसल्या मुळे पूर्ण प्रवास पाई करावा लागत आहे त्यात कुणाची सायकल मोटर सायकली माध्यमातून प्रवास सुरू आसेल तर तोही अवघडच खड्ड्यांमुळे अनेक वेळा सायकली मोटरसायकली पंचर होऊन त्या सायकली हातामध्ये दोन किलोमीटर ढकलत घ्याव्या लागत आहे . कारण मध्ये रस्त्याला खेडेगावातल्या कारणाने कुठेही टायर पंचर ची सुविधा नाही ती थेट वढाव मध्ये आहे त्यामुळे येथील सर्वच जनतेला त्खड्ड्यांमुळे खूप त्रास होत आहे शिवाय सदर रस्ता हा अरुंद असल्याकारणाने रस्त्यावरून दोन वाहने पास होत नाहीत खाड्यांव...
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई नेरुळ (नवी मुंबई) – प्रतिक यादव नेरुळ येथे निवासी वसाहतीत उच्च दाबाच्या ब्लास्टिंगचा धोकादायक प्रकार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण,....  अकार्यक्षम नेरूळ वार्ड अधिकारी जावडेकर यांची निष्क्रियता स्थानिक नागरिकांच्या तक्रारीला केराची टोपली... वय  नेरुळ सेक्टर १६ A येथील  इमारत विकास प्रकल्पात प्लॉट मालक डॉ. मनीषा जाधव, डायमेन्शन आर्किटेक्ट आणि संबंधित कंत्राटदार यांनी उच्च दाबाचे ब्लास्टिंग करून परिसरातील नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या धोकादायक ब्लास्टिंगमुळे रोज होणाऱ्या कंपनांनी आणि मोठ्या आवाजाने परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. विशेषतः लहान बालके, वृद्ध नागरिक व आजारी व्यक्तींना या स्फोटांमुळे मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या निवासस्थानांमध्ये तडे जाण्याचे प्रकार समोर आले असून, यामुळे भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाचे दुर्लक्ष – वारंवार तक्रारी असूनही कोणतीही कारवाई नाही नागरिकांनी यासंदर्भात नेरुळ वॉर्ड अधिकारी श्री. जावडेकर यांच्याकडे अ...
Image
 आवाज कोकणचा/ पनवेल काश्मीर दहशवादी हल्ल्यात पनवेल चे दिलीप दिसले मृत्युमुखी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल यांनी दिलेल्या माहिती नुसार आज रोजी पेहलगाम, काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता निसर्ग ट्रॅव्हल्स पनवेल येथून एकूण 39 पर्यटक जम्मू कश्मीर पर्यटनासाठी गेले होते त्यातील दिलीप देसले, राहणार खांदा कॉलनी पनवेल हे सदर हल्ल्यात मयत झालेले आहेत. तसेच सुबोध पाटील राहणार पनवेल हे जखमी झालेले आहेत (माणिक पाटील ह्या सुबोध पाटील यांच्या पत्नी आहेत)त्यांना श्रीनगर येथे हॉस्पिटलमध्ये एयरलिफ्ट करून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत.*
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई उरण /  प्रतिनिधी पत्रकार उत्कर्ष समिती उरण तालुका पदाधिकारी जाहीर... उरण येथील सजग डॅशिंग पत्रकार पुजा चव्हाण यांची उरण तालुका अध्यक्ष व रायगड जिल्हा अध्यक्षपदी वरिष्ठ पत्रकार मिलींद खार पाटील यांची १३ एप्रिल रोजी नियुक्ती  झाल्यानंतर उरण तालुक्यातील पत्रकारांना एकत्र करून पत्रकार उत्कर्ष समिती चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शना खाली आठवड्यातच  उरण   शासकिय विश्रामगृह उरण येथे २०/०४/२०२५ रोजी तालुक्यातील पदाधिकाऱ्याची निवड करण्यात आली.  यावेळी उरण तालुका उपाध्यक्षपदी तृप्ती भोईर, कार्याध्यक्षपदी सचिन घबाडी,  स चिवपदी अनंत नारंगीकर, सदस्यपदी मनोहर भोईर , रणीता ठाकूर , सायली साळुंखे यांची निवड करण्यात आली, यावेळी पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या उरण तालुका अध्यक्ष सौ रंजना म्हात्रे सदस्य सौ रंजना पाटील उरण चे वरिष्ठ पत्रकार श्री प्रदीप पाटील उपस्थित होते  
Image
   आवाज कोकणचा / नवी मुंबई पनवेल - प्रतिनिधी    सत्याची वाटचालचे संपादक श्री  गोविंद जोशी यांची पत्रकार उत्कर्ष समितीच्या कोकण अध्यक्षपदी निवड , विविध स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव ... रायगडचे सुपुत्र सत्याची वाटचाल वृत्तपत्राचे संपादक व धडाडीचे पत्रकार श्री . गोविंद जोशी यांच्या पत्रकारीता क्षेत्रातील व सामाजिक कार्याची दखल पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष  डॉ. अशोक म्हात्रे यांनी घेऊन शासकिय विश्रामगृह पनवेल येथे झालेल्या सभेमध्ये सर्वानुमते कोकण अध्यक्ष  पदी निवड केली आहे.  रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह पनवेल येथे झालेल्या निवड प्रक्रिये वेळी  पत्रकार उत्कर्ष समिती चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.श्री अशोक म्हात्रे यांनी सर्वांच्या उपस्थितीत महाराष्ट्र संघटक पदी निवड झाल्याची घोषणा केली तसे पत्र देण्यात आले समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर नजर ठेवून समाजाला आवश्यक मदत करण्यासाठी श्री. गोविंद जोशी नेहमी अग्रेसर असतात.  अनेक वेळा सामाजिक जाणीव याचे भान ठेवत स्वतः आर्थिक मदत करून गोरगरिबांना मदतीचा हात पुढे करत असतात...
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई पनवेल - प्रतिनिधी   पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्रच्या संघटकपदी जेष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते गुरूनाथ तिरपनकर  यांची नियुक्ती... कोकण सुपुत्र जेष्ठ पत्रकार  व सामाजिक कार्यकर्ते श्री गुरुनाथ तिरुपणकर यांच्या धडाडीच्या कार्याची दखल घेत पत्रकार उत्कर्ष समितीच्या शासकीय विश्रामगृह पनवेल येथे झालेल्या सभेमध्ये सर्वानुमते महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी निवड करण्यात आली आहे. रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह पनवेल येथे झालेल्या निवड प्रक्रिये वेळी  पत्रकार उत्कर्ष समिती चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.श्री अशोक म्हात्रे यांनी सर्वांच्या उपस्थितीत महाराष्ट्र संघटक पदी निवड झाल्याची घोषणा केली तसे पत्र देण्यात आले समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर नजर ठेवून समाजाला आवश्यक मदत करण्यासाठी श्री तीरपणकर नेहमी अग्रेसर असतात.  अनेक वेळा सामाजिक जाणीव याचे भान ठेवत स्वतः आर्थिक मदत करून गोरगरिबांना मदतीचा हात पुढे करत असतात. श्री तिरपणकर यांच्या या निवडीमुळे समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई पनवेल - प्रतिनिधी   पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्रच्या उरण तालुका अध्यक्षपदी डॅशिंग पत्रकार पूजा चव्हाण यांची नियुक्ती... पत्रकार उत्कर्ष समिती उरण तालुका अध्यक्षपदी शिवराज्य न्युज चैनलच्या डॅशिंग पत्रकार पूजा चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह पनवेल येथे झालेल्या निवड प्रक्रिये वेळी  पत्रकार उत्कर्ष समिती चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.श्री अशोक म्हात्रे यांनी सर्वांच्या उपस्थितीत पूजा चव्हाण यांची उरण तालुका अध्यक्षपदी निवड घोषित केली. समाजात घडणाऱ्या विविध विषयांवर आक्रमकपणे लिखाण करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखणच्या माध्यमातून पूजा चव्हाण पत्रकारिता करत असतात. पूजा चव्हाण यांच्या या निवडीने समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Image
आवाज कोकणचा / नवी मुंबई पनवेल - प्रतिनिधी   पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्रच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी वरिष्ठ पत्रकार मिलिंद खारपाटील यांची निवड  पत्रकार उत्कर्ष समिती रायगड जिल्हाध्यक्ष पदी आवाज महामुंबईचा या  चॅनेल चे संपादक श्री मिलिंद खारपाटील यांची निवड करण्यात आली आहे. रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह पनवेल येथे रायगड जिल्ह्यातील पत्रकार परिषदेत पत्रकार उत्कर्ष समिती चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.श्री अशोक म्हात्रे यांनी घोषणा करून त्यांना निवडपत्र दिले. श्री मिलिंद खारपाटील हे गेल्या 36 वर्षात अनेक वृत्तपत्रात निर्भीडपणे पत्रकारितेचे काम करत आहेत. बुलंद आवाज, किनारपट्टी, रामप्रहर, कर्नाळा ,किल्ले रायगड , पुण्यनगरी, आपले  साम्राज्य, कोकण टाइम्स,उरण टाईम्स आवाज कोकणचा या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून, साप्ताहिक श्रमजीवी मध्ये सहसंपादक आणि साप्ताहिक श्रमशक्ती मध्ये त्यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम केले आहे. मी 24 तास, शिवसत्ता या यू ट्यूब वाहिनी मध्ये पत्रकार , महामुंबई 24 बाय 7 मध्ये संपादक म्हणून काम केले आहे. सध्या आवाज  महामुंबईचा चॅनेल चे संपाद...
Image
 आवाज कोकणचा / नवी मुंबई  उरण ( पुजा चव्हाण ) अपघात टाळण्यासाठी वाहने सुरक्षित चालविण्याचे उरण वाहतुक शाखा पोलीस निरीक्षक श्री. अतुल दहिफळे यांचे आवाहन      मागील काही महिन्यात उरण  तालुक्यात मोटार सायकल अपघातांचे प्रमाण वाढले असून त्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी  पडले आहेत. २०२४ ते या वर्षी  आत्ता पर्यंत १९०  मोटर सायकल व जड - अवजड वाहन चालवणाऱ्या चालकांवर मद्य प्राशन करून गाडी चालवल्या मुळे कारवाई करण्यात आलेल्या आहेत.  त्यामुळे अपघातातचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे       सध्या उरण तालुक्यात गावोगावी  ग्रामदेवतेची यात्रा व पालखी सोहळे उत्साहात साजरे होत असून  या वेळी अनेक ठिकाणी मद्य प्राशन करून वाहन चालविण्याचे प्रमाण वाढत आहे.  यामुळें  अपघातांच्या संख्येत प्रकर्षाने वाढ होण्याची शक्यता असते.  त्यामूळे  कोणीही कोणत्याही प्रकारची नशा ( दारू ) करून वाहन ( विशेष करून मोटार सायकल ) चालवून अपघातास कारणीभूत होऊ नका ही आपल्या सर्व उरण वासियांना कळकळीची विनंती आहे असे आवाहन उरण वाहतूक शाख...